नवे सरन्यायाधीश गवई यांची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्त झाल्यावर खासदार, राज्यपाल अथवा इतर पदे स्वीकारतात . 14 में 2025 रोजी सरन्यायाधीश पदी विराजमान होणारे भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मी सरन्यायाधीश पदावरून निवृत झाल्यावर असे कोणतेही राजकीय पद स्वीकारणार नाही हे स्पष्ट केले आहे .
बौद्ध समाजातून सरन्यायाधीश होणारे न्या .भूषण गवई पहिले व्यकि आहेत 14 मे रोजी भारताचे सरन्यायाधीश होणारे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी रविवारी दिल्ली. येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितले की मी जेव्हा सरन्यायाधीश पदावरून निवृत होईन त्यावेळी निवृत्तीनंतरच्या कोणत्याही पदाचा स्वीकार करणार नाही . संविधान सर्वोच्च आहे असे सांगून संसद किंवा न्यायपालिका श्रेष्ठ आहे की नाही यावरील वादविवादाला पूर्णविराम न्यायमूर्ती गवई म्हणाले की पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल ऐकून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना धक्का बसला . सरन्यायाधीश संजीव खन्ना बाहेर असल्याने न्या . गवई यांनी बोलावलेल्या पूर्ण न्यायालयाच्या बैठकीचा संदर्भ दिला.
“जेव्हा देश संकटात असतो तेव्हा सर्वोच्च न्यायालय अलिप्त राहू शकत नाही. आपणही देशाचा भाग आहोत,” असे ते म्हणाले. खटले प्रलंबित राहणे ते न्यायालयांमधील रिक्त जागा, न्यायाधीशांची राजकारण्यांसह सामान्यांना भेटणे आणि न्यायव्यवस्थेविरुद्धची विधाने अशा मुद्द्यांवर ते बोलत होते.
राजकारणी आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संसद सर्वोच्च आहे या विधानांबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, “संविधान सर्वोच्च आहे. केशवानंद भारती निकालात १३ न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निकालात हे सिद्ध झाले आहे.”
न