नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रुपयावरील सततच्या दबावापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी गुरुवारी अंदाजे २ ते ३ अब्ज डॉलरची विक्री केली आणि शुक्रवारी पुन्हा हस्तक्षेप केला, त्यामुळे डॉलस्च्य तुलनेत ०.६४ टक्क्यांनी वधारून रुपया ९६.२० वर बंद झाला .
बँकर्सनी सांगितले की, आरबीआयने गुरुवारी बाजार उघडण्यापूर्वीच मोठ्या सरकारी बँकांमार्फत हस्तक्षेप केला होता, ज्यात प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये सुमारे ५०० दशलक्ष डॉलरची विक्री झाल्याचे वृत्त आहे. त्या कालावधीतील मर्यादित तरलतेमुळे या हस्तक्षेपाचा प्रभाव अधिक वाढला, असेही त्यांनी सांगितले.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अलीकडच्या दिवसांच्या तुलनेत या ताज्या हस्तक्षेपात लक्षणीय वाढ झाली आहे, जेव्हा सरासरी डॉलर विक्री सुमारे १ अब्ज डॉलर होती.मुंबईस्थित एका बँकेतील व्यापाऱ्याने सांगितले की, गुरुवारी आरबीआयने केलेली डॉलर विक्री ही ‘किंमतीच्या पातळीवर अवलंबून नसलेली’ (level-agnostic) दिसत होती आणि तिचा उद्देश रुपयामध्ये तेजी आणणे व चलनाच्या विरोधात होणाऱ्या सट्टेबाजीला परावृत्त करणे हा होता.
एका खासगी क्षेत्रातील बँकेच्या ट्रेझरी अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की, “सध्या आरबीआय ही एकमेव प्रमुख डॉलर विक्रेती आहे.” त्यांनी पुढे असेही सांगितले की, जोपर्यंत तेलाच्या किमती कमी होत नाहीत, तोपर्यंत हा कल कायम राहू शकतो.काही व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार, आरबीआयने गुरुवारी ४-५ अब्ज डॉलरपर्यंतची विक्री केली असावी. मिळालेल्या वृत्तानुसार, संपूर्ण ट्रेडिंग सत्रात मोठा हस्तक्षेप सुरू होता आणि रुपया ९५.९९ ते ९६.५० च्या दरम्यान फिरत होता.
ईटीने दिलेल्या वृत्तानुसार, फिनरेक्स ट्रेझरी ॲडव्हायझर्सचे ट्रेझरी प्रमुख अनिल भन्साली म्हणाले, “आरबीआयने आज ४-५ अब्ज डॉलरची विक्री केली असावी, त्यामुळे बऱ्याच काळानंतर मोठ्या प्रमाणात डॉलरची विक्री झाली.”तेलाच्या किमती हा प्रमुख दबावबिंदूमध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींचा रुपयावर मोठा दबाव कायम आहे. जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश असलेला भारत, आयात केलेल्या कच्च्या तेलावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे, ज्यामुळे तेलाच्या किमती वाढल्यावर तेल शुद्धीकरण करणाऱ्यांकडून डॉलरची मागणी वाढते.
गुरुवारच्या हस्तक्षेपापूर्वीच्या दोन आठवड्यांत रुपया जवळपास २.५ टक्क्यांनी कमकुवत झाला होता, तर आर्थिक वर्ष २०२७ मध्ये आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत या चलनाचे ३ टक्क्यांहून अधिक आणि आर्थिक वर्ष २०२६ मध्ये जवळपास ११ टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे.”तेलाच्या वाढलेल्या किमती आणि एफपीआयचा (FPI) बहिर्वाह यांसारख्या मूळ भावना कायम आहेत आणि जोपर्यंत त्या टिकून राहतील, तोपर्यंत चलनात कमजोरी राहील,” असे करूर वैश्य बँकेचे ट्रेझरी प्रमुख व्ही. आर. सी. रेड्डी यांनी ‘ईटी’ला सांगितले.
सरकार पुढील उपाययोजनांचा विचार करत आहेरुपयाला स्थिर करण्यासाठी भारत अतिरिक्त उपाययोजनांचाही विचार करत आहे, असे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी सांगितले.चलनाला आधार देण्यासाठी धोरणकर्ते संभाव्य व्याजदर वाढीचाही विचार करत आहेत.”दरांमध्ये हालचाल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रुपयाला मदत झाली,” असे रेड्डी म्हणाले.डीबीएस बँकेच्या अंदाजानुसार, २०२६ च्या उर्वरित काळात रुपया ९५-१०० च्या दरम्यान राहील.

