चेन्नई – दरडोई उत्पन्नाच्या आधारावर भारताचा क्रमांक जगात 140 आहे. आपल्यापुढे 139 देश आहेत. जीवनमान अधिक चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रयशक्ती समानतेचा (पीपीपी) विचार केला तरी, भारताचे स्थान 119 व्या क्रमांकावर आहे 118 देश आपल्या पुढे आहेत याचा गांभीर्याने विचार करा असा सल्ला चेन्नई येथील अर्थ व्यवस्थापन तज्ञ डी . मुथ्थूकृष्णन यांनी दिला आहे
भारत सध्या जगातील पाचवी मोठी अर्थसत्ता आहे आणि काही काळात तिसरी अर्थसत्ता होणार असल्याचा डांगोरा आपण पिटतो . मात्र सर्वसामान्यांच्या हाती काय पडते याचा विचार आपण करीत नाही असे सांगून डी मूथ्थूकृष्णन म्हणाले की भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) वरून देशातील समृध्दीबद्दल जे उत्सवी स्वरूप आपण साजरे करतो त्याला काही अर्थ नाही . दरडोई उत्पन्न न पाहता जीडीपी पाहण्यात काय अर्थ आहे ?
भारतात .प्रभावी वाढीचे अंदाज आहेत . मजबूत कृषी आणि मजबूत सेवांमुळे आर्थिक वर्ष 25 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.5 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे .तरीही”दरडोई जीडीपीच्या आधारावर आमचा क्रमांक 140 आहे. आपल्यापुढे 139 देश आहेत. जीवनमान अधिक चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित करण्यासाठी वापरल्या जाणार्या क्रयशक्ती समानतेचा (पीपीपी) विचार केला तरी, भारताचे स्थान 119 व्या क्रमांकावर आहे. दरडोई उत्पन्न 10 हजार पर्यंत वाढविण्यासाठी आपण योजना आखल्या पाहिजेत असेही ते म्हणाले .