Tuesday, July 21, 2026
Homeशिक्षणबातम्याराजीनामा कसा लिहावा हे धर्मेंद्र प्रधान यांना ठाऊक नसावे - मोईत्रा

राजीनामा कसा लिहावा हे धर्मेंद्र प्रधान यांना ठाऊक नसावे – मोईत्रा

नवी दिल्ली: ‘ तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मंगळवारी टीका केली की धमेंद्र प्रधान यांना कदाचित राजीनामा पत्र कसे लिहायचे हेच माहित नसावे .

नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनादरम्यान, मोईत्रा म्हणाल्या.”कदाचित, अगदी कदाचित, शिक्षण मंत्र्यांना राजीनामा पत्र कसे लिहायचे हे माहित नसावे. कारण आरएसएस केवळ दया-याचिका कशा लिहायच्या, हेच शिकवते,” असे त्यांनी ‘एक्स’ वर लिहिले.संसदेच्या दिशेने काढलेला ‘संसद चलो’ मोर्चा पोलिसांनी बळाचा वापर करून रोखल्यानंतर दुसऱ्या दिवशीही दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP च्या कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन सुरूच होते. याच पार्श्वभूमीवर मोईत्रा यांनी ही टिप्पणी केली.

मुसळधार पाऊस, कडक सुरक्षा व्यवस्था आणि सोमवारी झालेली कारवाई असूनही, मंगळवारी स्वयंसेवक आंदोलनस्थळीच थांबून राहिले. पोलिसांनी तंबू आणि इतर तात्पुरती बांधकामे हटवल्यानंतर त्यांनी व्यासपीठ स्वच्छ केले; या कारवाईदरम्यान व्यासपीठाचे छत फाटले होते.

CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पोलीस कारवाईत जखमी झालेल्या समर्थकांची, विशेषतः महिला आंदोलकांची माफी मागितली. ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये ते म्हणाले, “मी आमच्या सर्व समर्थकांची, आणि विशेषतः पुरुष पोलीस अधिकाऱ्यांकडून निर्दयीपणे मारहाण झालेल्या तरुणींची माफी मागतो. आम्ही कदाचित अधिक चांगली व्यवस्था करू शकलो असतो.”दिपके यांनी असाही आरोप केला की, सरकार “केवळ एका धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी” बळाचा वापर करण्यास तयार होते आणि २० हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूला शिक्षण मंत्रीच जबाबदार आहेत, असा दावाही त्यांनी केला. त्यांनी जखमी आंदोलकांना स्वतःशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments